Saturday, June 14, 2025
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home संपादकीय

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने…

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 26, 2021
in संपादकीय
0
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने…
0
SHARES
76
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

प्रत्येकाने भारताचे संविधान समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही.

◾संजीव जोशी, संपादक दै. राजतंत्र

हे पण वाचा

भरतच्या बुडत्या विमानाला कोणाचा टेकू

बावडा तलाव घोटाळ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी धुतले हात

आज प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताचा कारभार भारताच्या संविधानानुसार सुरु झाला. दरवर्षी आपण उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करतो. कदाचित कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ध्वजवंदनासाठीही गर्दी करता येणार नाही. ध्वजवंदनाला नाही जाऊ शकलो तरी खंत बाळगायचे कारण नाही. गर्दी टाळून देखील आपण देशासाठी कार्य करणार आहोत. त्या निमित्ताने एक निश्चय आपण निश्चित करु शकतो. तो म्हणजे प्रजासत्ताकदिनानिमित्त भारताचे संविधान समजून घेण्याचा संकल्प.

भारताचे संविधान हा आपल्या देशाचा सर्वोच्च असा कायदा आहे. आपल्या देशाचा कारभार हा संपूर्णपणे भारताच्या संविधानावर आधारित असा चालतो. संविधानामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कशी करायची, राज्यसभा व लोकसभेची निर्मिती कशी करायची, प्रशासनाचा कारभार कसा चालवायचा, न्यायालयाची व्यवस्था कशी असेल, जिल्हा परिषदेचा कारभार कसा चालेल, थेट अगदी ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालेल यासंदर्भात इत्यंभूत माहिती दिलेली आहे. देशाच्या कुठल्याही कारभारासंदर्भात सर्व व्यवस्था भारताच्या संविधानामध्ये नमूद केलेली आहे. आणि म्हणून संविधान जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्या देशाची लोकशाही व्यवस्था आपल्याला समजू शकत नाही. आणि लोकशाही व्यवस्था जर समजून घ्यायची असेल तर भारताचे संविधान समजून घ्यायला पर्याय नाही.

भारताच्या संविधानामध्ये समजण्यासारखं काय आहे? अगदी आपल्याला त्यातल्या सर्वच तपशील समजला पाहिजेच असे आवश्यक नाही. त्यामध्ये 25 प्रकरणे, 448 कलमे आणि 12 अनुसूची आहेत. त्यातील अनेक अनुसूची आणि अनेक कलमे याची आपल्याला लगेच काही आवश्यकता भासत नाही. परंतु सुरुवातीची प्रकरणे आहेत या प्रकरणांमध्ये नागरिकत्व कसे प्राप्त होते, राज्यांसंदर्भात आणि त्यांच्या सीमांसंदर्भात माहिती असते. आणि आपल्याला जे समजून घ्यायचे आहे, ते सर्वात महत्वाचे म्हणजे भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले मुलभूत अधिकार. यासंदर्भात प्रकरण-3 आहे ते आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. या प्रकरण 3 मध्ये साधारणपणे अनुक्रमांक 12 ते 36 अशी मूलभूत अधिकारांची कलमे आहेत आणि त्याच्यानंतर 51 पर्यंत ही आपल्याला मार्गदर्शक तत्त्वे दिलेले आहेत. देशाचा कारभार कसा चालवायचा यासंदर्भात ही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे 4 क हे प्रकरण, त्या प्रकरणामध्ये आपल्या भारतीय नागरिकांना मूलभूत कर्तव्यांची जाणीव करून दिलेली आहे. त्यामध्ये साधारण अकरा उप कलमे आहेत. 51 क नावाचे हे जे कलम आहे त्याला 11 उप कलमे आहेत ती प्रत्येकाने वाचावी अशी आहेत. थोडक्यात म्हणजे तीस चाळीस ज्या ओळी आहेत त्या ओळी ह्या प्रत्येक नागरिकाला माहिती पाहिजेत. त्या शिवाय त्याला देशाच्या कारभाराविषयी किंवा नागरिक म्हणून घडण्यासाठी किमान माहिती उपलब्ध होणार नाही. यानंतर मग जी अनेक प्रकरणे आहेत ती प्रकरणे आपल्याला जशी गरज असेल, जशी आवश्यकता भासेल त्या प्रमाणे आपण समजून घेऊ शकतो.

जोपर्यंत प्रत्येक नागरिक मूलभूत कर्तव्य समजून घेत नाही तो पर्यंत खऱ्या अर्थाने तो काही या देशाचा नागरिक झाला असे आपण म्हणू शकत नाही. आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो परंतु लोकशाही व्यवस्थेविषयी आपल्याला माहीतीच नसेल तर त्यामुळे लोकशाहीचे खूप मोठे नुकसान होते. आणि म्हणून एकीकडे भारतीय संविधातून आपले अधिकार समजून घेत असतानाच, आपली देशासाठीची कर्तव्ये समजून घेणे आवश्यक आहे.

भारताचे संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे, आणि जे जे कायदे होतील, केंद्राचे किंवा राज्याचे, ते सर्व भारतीय संविधानातल्या मूळ ढाच्याप्रमाणेच बनतात. म्हणजे जी मूलभूत कर्तव्ये आहेत किंवा आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांची प्राप्ती होण्यासाठी, ते अधिकार संरक्षित होण्यासाठी वेगवेगळे कायदे बनवले जातात. आणि ते जे कायदे आहेत, ते कायदे संविधानाशी सुसंगत आहेत किंवा नाही हे सर्वोच्च न्यायालयाकडून तपासले जाऊ शकते. सविधान हा सर्वोच्च कायदा अशासाठीच मानला जातो की संविधानाला विसंगत असे जे काही कायदे आहेत ते स्वातंत्र्यानंतर रद्द करण्यात आले आणि इथून पुढे जे सगळे कायदे तयार होतील ते मात्र संविधानाला अनुरूप असेच असले पाहिजेत. त्यातून नागरिकाचा मूलभूत अधिकाराचा भंग होतो असे वाटले किंवा तो अन्यायकारक वाटला, किंवा नैसर्गिक न्यायाला ते विसंगत ठरले, नैसर्गिक न्याय न देणारे ठरले तर मात्र ते न्यायालयाकडून रद्द केले जातात. भारताचे संविधान हा सर्वोच्च कायदा असल्या कारणाने तो समजल्यास आपल्याला एक कायदेशीर समज प्राप्त होते. कुठलाही कायदा त्याला सहज समजू शकतो. म्हणजे एखादा कायदा सुद्धा अन्यायकारक आहे किंवा कसा ते आपल्याला समजू शकते. हे आपल्याला समजल्यास आपण त्या कायद्याला भविष्यात विरोधही करु शकतो. असा कायदा बदलू ही शकतो. तो रद्द करायला भाग पाडू शकतो. कारण या लोकशाही व्यवस्थेमध्ये अंतिमतः आपणच राजे असतो. आणि हा देश आपणच चालवणार असतो. पण हा देश कसा चालतो हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही, तो पर्यंत आपण देश चालवू शकणार नाही किंवा आपण राजा या वर्गामध्ये बसू शकत नाही. राजाला जर आपल्या राज्याचा कारभार कसा चालतो हे समजले नाही तर तो देश महासत्ता वगैरे बनू शकत नाही. आणि म्हणून आपण मतदार राजाच्या भुमीकेत येण्यासाठी भारतीय संविधान समजून घेतले पाहिजे.

भारतीय संविधान समजून नाही घेतले तर आपल्याला स्वाभिमानाने जगणे जमणार नाही. आपण लोकप्रतिनिधी जर जबाबदारीने निवडून देणार नसू तर आपण पारतंत्र्यातच आहोत. आपल्या हातामध्ये आपले आणि देशाचे भवितव्य सुरक्षित अशा पद्धतीने राहू शकत नाही. आणि म्हणून देशाचे भवितव्यपण जर सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचे बारकावे समजून घेतले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येकाने भारताचे संविधान समजून घेतलेच पाहिजे. त्याशिवाय पर्यायच नाही. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण तसा निश्चय करु या!
जयहिंद!

आजच शेअर करा

Related Posts

भरतच्या बुडत्या विमानाला कोणाचा टेकू
जिल्हा

भरतच्या बुडत्या विमानाला कोणाचा टेकू

April 24, 2025
बावडा तलाव घोटाळ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी धुतले हात
ताज्या बातम्या

बावडा तलाव घोटाळ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी धुतले हात

March 24, 2025
आसनगाव जमीन घोटाळाप्रकणात जिल्हाधिकारी फ्लाईट मोडवर
ताज्या बातम्या

आसनगाव जमीन घोटाळाप्रकणात जिल्हाधिकारी फ्लाईट मोडवर

March 17, 2025
जिजाऊचा आधारवड बोईसरकरांन साठी सामाजिक पर्याय!
ताज्या बातम्या

जिजाऊचा आधारवड बोईसरकरांन साठी सामाजिक पर्याय!

February 13, 2023
बंद कारखाने भंगार माफियांना पोलिसांच्या मदतीने मोकळे रान
जिल्हा

बंद कारखाने भंगार माफियांना पोलिसांच्या मदतीने मोकळे रान

November 10, 2022
पालघर जिल्ह्यात दिसणार एकनाथांचा करिष्मा!
ताज्या बातम्या

पालघर जिल्ह्यात दिसणार एकनाथांचा करिष्मा!

July 6, 2022
Next Post
कारखान्यांचे चोरटे प्रदूषण सुरूच

कारखान्यांचे चोरटे प्रदूषण सुरूच

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

October 17, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021

EDITOR'S PICK

जून मध्ये होणार एमबीबीएस परीक्षा

जून मध्ये होणार एमबीबीएस परीक्षा

April 26, 2021
काँग्रेस चा वर्धापन दिन सोडून राहुल गांधींनी दिलं परदेश दौऱ्याला प्राधान्य.

काँग्रेस चा वर्धापन दिन सोडून राहुल गांधींनी दिलं परदेश दौऱ्याला प्राधान्य.

December 28, 2020
ग्रामीण भागात महावितरणची वीज यंत्रणा कोलमडली.

ग्रामीण भागात महावितरणची वीज यंत्रणा कोलमडली.

May 20, 2021
तारापुरची विषारी हवा

तारापुरची विषारी हवा

November 2, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • घिवली गावाचा सरपंच बनावट…
  • गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..
  • वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?
  • कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!