Sunday, June 15, 2025
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

विक्रमगडमधे पाणी पुरवठा योजना अपूर्णच

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 26, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या, राज्य
0
विक्रमगडमधे पाणी पुरवठा योजना अपूर्णच
3
SHARES
203
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

13 वर्षांपासून तालुक्यातील पाणीपुरवठा योजना अपुर्ण अवस्थेत; मंत्रालयात तक्रारी करून ही कारवाई नाही

पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: विक्रमगड तालुक्यात मार्च महिन्यापासून काही गाव पाड्यात पाण्याचा खड-खंडात सुरु होण्यास सुरवात होते. मे महिन्यापर्यंत तर काही गाव-पाड्यात पाण्याची बिकट आवस्था होते. तालुक्यातील काही गावात खूपच कमी पाण्याचा साठ शिलक असून नदी- नाळे आटले असून विहारिणी तळ गाठण्यास सुरवात झाली असताना दरवर्षी पाणी टंचाईग्रस्त असणाऱ्या गाव- पाड्यांना कायम स्वरूपी उपाययोजना करण्याचे तर दूरच पण गेल्या 13 वर्षापासूनच्या तालुक्यातील अनेक पाणी पुरवठा योजना अपूर्ण अवस्थेत आहेत.

हे पण वाचा

घिवली गावाचा सरपंच बनावट…

गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..

विक्रमगड तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींसाठी राबविण्यात आलेल्या नळपाणी योजना आज पर्यंत अर्धवट आवस्थेत आहेत यातील 6 योजना 14 वर्षापासून तर 4 योजना 7 वर्षापासून रखडलेल्या असल्याने या योजनाच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनाच्या अपूर्ण अवस्थेबाबत जिल्हा परीषद प्रशासनाकडे अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी करून ही जिल्हा परीषद पाणी पुरवठा विभाग प्रत्यक्ष कुठल्याच प्रकारची चौकशी करत नसल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. या योजनांसाठी तब्बल 1 कोटी 97 लाख 59 हजार रुपये खर्च झाला आहे. तालुक्यातील 2004-05 साला पासून पाणी पुरवठा योजनेअंतर्गत देहर्जे गावातील योजनेसाठी 15.85 लाख निधी मंजूर होता त्यापैकी 12.61 लाख वितरीत करण्यात आला.साखरे गावासाठी 22.99 निधी मंजूर होता त्यापैकी 17.73 वितरीत करण्यात आला आहे, केव( शीलशेत) गावासाठी 21.61 निधी मंजूर होता त्यापैकी 8.61 निधी वितरीत करण्यात आला आहे.त्यांनतर या योजनांचे कामच बंद करण्यात आल्याने या योजनात अपहार झाल्याने या योजना 13 वर्षा पासून रखडल्या आहेत.

2005-06 साली दादडे ( कमळ पाडा) गावासाठी 23.04 निधी मंजूर होता त्या पैकी 8.62 निधी वितरीत करण्यात आला आहे.जांभा- पोचाडा गावा साठी 10.51 निधी मंजूर होता त्या पैकी 6.61 निधी वितरीत करण्यात आला आहे .हातने गावासाठी 15.88 निधी मंजूर होता त्या पैकी 6.79 निधी वितरीत करण्यात आला आहे.तर 2011-12 साली खांड-उघानीपाडा गावसाठी 46.64 निधी मंजूर होता त्या पैकी 39.88 निधी वितरीत करण्यात आला आहे. टेटवाली ( बागपाडा) गावासाठी 34.24 निधी मंजूर होता त्यापैकी 29.27 निधी वितरीत करण्यात आला उपराले गावासाठी 45.44 निधी मंजूर होता त्या पैकी 38.85 निधी वितरीत करण्यात आला उटावली- पोटखल साठी 44.99 निधी मंजूर होता त्या पैकी 25.64 निधी वितरीत करण्यात आला आशा साखरे, केव, खांड -उघानीपाडा, दादाडे जांभा, हाताने, टेटवली, उपराले, उटावली, देहर्जे या गावांसाठी स्वातंत्र नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात आल्या, यासाठी निधी हि वितरीत करण्यात आला मात्र या योजनांमधील 6 योजनांचे काम 2004-05 मध्ये,तर 4 योजना 2011-12 मध्ये हाती घेण्यात आल्या. यासाठी निधी वितरीत करण्यात आला. यासाठी झालेल्या कामाचा हिशोब तब्बल 2 कोटीच्या आसपास निधी हि खर्च झाला. अशी माहिती पंचायत समिती कडून देण्यात आली आहे. मात्र आजही या काही पाणी पुरवठा योजनेतील काही गावात नळाला पाणी आजपर्यंत आलेले नाही. यातील देहर्जे, साखरे, केव या तीन योजनातील अपहार झाल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल आहे. तर बाकीच्या योजना या ना त्या कारणाने अद्याप रखडलेल्या आहेत.

योजनांचा निधी ग्रामपंचायातीना देण्यात येत असून पाणी पुरवठा विभाग फक्त देखा रेखीचे काम करते असा युक्तिवाद पाणी पुरवठा विभाग कडून करण्यात येतो. मात्र ग्रामीण भागातील बहुतांशी ग्रामपंचायती सक्षम नसल्याने ठेकेदार नेमून काम करण्यात येते. तरीही या योजना आजतागायत पूर्ण झाल्या नाहीत. या – ना त्या कारणाने या योजना अपूर्ण असल्याने या गावातील नागरीकांना पाण्यासाठी विहीर,नदी- नाल्यांचा आधार घ्यावा लागतो इतका निधी खर्च होऊनही या गावातील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेऊन काय साध्य झाले. या योजना बंद अवस्थेत असून बराच कालावधी उलटला आहे.या योजनात गैरप्रकार झाल्याची नागरिकांकडून शक्यता वर्तवण्यात आली आहे, आसे असताना पाणी पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता 4 पाणी पुरवठा योजनाचे काम चालू असून 4 पाणी पुरवठा योजना लवकर पूर्ण होणार असल्याचे दावा पाणी पुरवठा अधिकार्यांनी केला आहे. त्यातच अंदाज पत्रकात वाढ करण्याचा प्रयत्न ठेकेदार व ग्रामपंचायती प्रयत्नात आहेत .मात्र या योजना मंजूर झाल्या तेव्हाच या योजना तडीस नेणे गरजेचे असताना. या योजनाच्या कामात चाल ढकल करून काय साध्य झाले असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. त्यात या योजना रखडवण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व ग्रामपंचायतीचे संबधीत पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करुन दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

⭕मंत्रालयात तक्रारी करून ही चौकशी नाही

विक्रमगड तालुक्यातील या योजनांवर करोडोचा खर्च झाला आहे. तरी आजतागायत या योजना अपुर्ण असल्याने तालुक्यात कृत्रीम पाणी टंचाई दरवर्षी निर्माण होत आहे. या बाबत काही नागरिकांनी मंत्रालयात मागील दोन वर्षापुर्वी तक्रार ही केली होती. त्याचप्रमाने पंचायत समिती मार्फ़त जिल्हा परीषदेकडे ही तक्रार केली असताना या योजनाची प्रत्यक्ष कुठलीच चौकशी झाली नाही. विक्रमगड मतदार संघाचे माजी आमदार तथा माजी पालकमंत्री विष्णु सवरा यानी त्यांच्या मंत्रीपदाच्या कारकीर्तित विक्रमगड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या योजना रखडवनाऱ्यावर कारवाई करण्यात येनार असल्याचे घोषणा केली होती. मात्र त्या नंतर काहीच हालचाल झाली नाही आणि आजही या योजना बंद स्थितीत आहेत.

⭕नवीन पाणी पुरवठा योजना
मुख्यमंत्री ग्रामीण पुरवठा योजने अंतर्गत विक्रमगड तालुक्यात खोस्ते ( गावित पाडा), आलोंडे, कासा बु या गावात योजना मंजूर झाल्या आहेत. त्यामुळे या गाव-पाडातील पाणी प्रश्न सुटनार असुन योग्य ठेकेदारास या योजनेचे काम देवुन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली लवकरात लवकर या योजना पूर्ण करण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे.

◾तालुक्यातील रखड़लेल्या योजना पुर्ण करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. या योजना लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी आम्ही सर्वोत्त परीने प्रयत्न चालु आहेत. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत तालुक्यातील अनेक विहीरी नुतनिकरणची कामे सुरु आहेत

  • एस.बी.कदम
    ( प्रभारी पाणी पुरवठा अभियंता,पंचायत समिति विक्रमगड)

◾ तालुक्यांती या पाणी पुरवठा योजना गेल्या 11-12 वर्षा पासून अपूर्ण अवस्थेत आहेत. या योजनेचा निधी ही. काढण्यात आले आहेत. तरीही या योजना अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. या योजनाचा निधी काढनार्या संबंधित अधिकारी व ठेकेदार याची चौकक्षि करुण संबंधितावर गुन्हे दाखल करुण कड़क कारवाई करावी.या बाबत मंत्रालयात तक्रारी करून ही संमबिधितावर कुठलीच कारवाई होत नाही

  • डॉ. सिद्धार्थ सांबरे
    (सामाजिक कार्यकर्ते)
आजच शेअर करा

Related Posts

घिवली गावाचा सरपंच बनावट…
जिल्हा

घिवली गावाचा सरपंच बनावट…

May 5, 2025
गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..
जिल्हा

गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..

May 5, 2025
वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?
जिल्हा

वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?

May 1, 2025
कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान
जिल्हा

कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान

April 24, 2025
भरतच्या बुडत्या विमानाला कोणाचा टेकू
जिल्हा

भरतच्या बुडत्या विमानाला कोणाचा टेकू

April 24, 2025
डहाणू बॅक पोखरून खाणारा पुन्हा निवडणूक उभा..
जिल्हा

डहाणू बॅक पोखरून खाणारा पुन्हा निवडणूक उभा..

April 22, 2025
Next Post
नागझरीत मातीचे बेकायदा उत्खनन

नागझरीत मातीचे बेकायदा उत्खनन

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

October 17, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021

EDITOR'S PICK

संचारबंदी मध्ये नागझरीत खाजगी वाहनांना पेट्रोल विक्री

संचारबंदी मध्ये नागझरीत खाजगी वाहनांना पेट्रोल विक्री

August 15, 2020
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून दस्तऐवज नोंदणी

आसनगाव प्रकरणात जिल्हाधिकारी संधी शोधण्याच्या प्रयत्नात

March 24, 2025
शेतात जमलेल्या पाण्यामुळे मजुरीचा खर्च तिप्पट

शेतात जमलेल्या पाण्यामुळे मजुरीचा खर्च तिप्पट

November 3, 2020
मराठी पत्रकार परिषदेकडून बोईसर मध्ये पत्रकार दिन साजरा

मराठी पत्रकार परिषदेकडून बोईसर मध्ये पत्रकार दिन साजरा

January 7, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • घिवली गावाचा सरपंच बनावट…
  • गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..
  • वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?
  • कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!