Thursday, April 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

लोकांनी पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थेमध्ये सहभाग वाढवला पाहिजे! – संजीव जोशी

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 24, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या, राज्य
0
0
SHARES
87
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

सर्वसामान्य लोकांनी लोकशाही व्यवस्थेमध्ये सहभागी व्हावे, स्वतःच्या व गावाच्या विकासाची सुत्रे स्वतःच्या हाती घ्यावी यासाठी भारताच्या संविधानात 1992 साली 73 व्या घटनादुरुस्ती करुन पंचायतराज व्यवस्था अस्तित्वात आणली गेली. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा त्रिस्तरीय व्यवस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक योजनांची अंमलबजावणीचे धोरण स्विकारण्यास आले. आणि ग्रामसभेला सर्वाधिक अधिकार देण्यात आले. ग्रामपंचायतीचा प्रत्येक निर्णय हा ग्रामसभेने घ्यायचा असतो. कुठली योजना हाती घ्यायची, प्राधान्यक्रम काय असावेत, वैयक्तिक लाभार्थ्यांची यादी निश्चित करणे असे सर्व काही निर्णय ग्रामसभेने घ्यायचे असतात. भारताच्या संविधानाच्या भाग ९ मधील तरतुदींनुसार ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीकडे जास्तीत जास्त अधिकार देण्यात आलेले आहेत. ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सरपंच आणि ग्रामपंचायतीने कारभार पहायचा असतो. ग्रामपंचायत ग्रामसभेला उत्तरदायी असते. असे असले तरी ग्रामसभांचे कामकाज पुरेसे प्रभावी पद्धतीने चालत नाही. लोक म्हणावे तितके जागृत नसल्यामुळे ग्रामसभेत न झालेले ठराव इतिवृत्तात घुसवले जातात आणि लोकांची फसवणूक केली जाते. लोकांनी ग्रामपंचायतींमध्ये घोटाळे झाल्यानंतर त्याबाबत गोंगाट करण्याऐवजी असे घोटाळे रोखण्याएवढे सतर्क राहिल्यास गावाच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी ते महत्वाचे योगदान ठरेल.

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४२(९) अन्वये काढण्यात आलेल्या अधिसूचनेद्वारे एखादे गाव अधिसूचित नावाने ओळखले जाते. २ हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या महसुली गावात भारताचे संविधानाच्या अनुच्छेद ४० मधील तरतुदीनुसार राज्य सरकारद्वारे ग्रामपंचायत स्थापन केली जाते. ग्रामपंचायत राबविणार असलेल्या सामाजिक, आर्थिक विकासाच्या योजना, कार्यक्रम व प्रकल्प यांना ग्रामसभेची मान्यता मिळाल्यानंतर ग्रामपंचायत अंमलबजावणी करते. ग्रामपंचायतीला विकास योजनांवर कोणताही खर्च करण्यास ग्रामसभेची परवानगी लागते. प्रत्येक आर्थिक वर्षात किमान ४ ग्रामसभा घेणे बंधनकारक असते. न घेतल्यास संबंधित सरपंच किंवा उप सरपंचाकडे पदभार असल्यास उपसरपंच अपात्र ठरेल व सचिवाला निलंबीत करुन शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद असते.

हे पण वाचा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

आदिवासी क्षेत्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेला अधिक अधिकार!

पालघर सारख्या आदिवासी क्षेत्रात Panchayat Extended Schedule Areas म्हणजे PESA (पेसा) या कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे. या कायद्याविषयी थोडक्यात समजून घेऊ या!

अनुसूचित क्षेत्रांतील ग्रामसभा व पंचायत यांसाठी विशेष तरतुदी (पेसा): पंचायतींच्या तरतुदी (अनुसूचित क्षेत्रांना लागू करणे) अधिनियम, १९९६ नुसार अनुसूचित क्षेत्रांतील ग्रामसभा व पंचायत यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. याला इंग्रजी मध्ये Panchayat Extended Schedule Areas असे म्हणतात व त्यामुळे त्याचा संक्षिप्त उल्लेख PESA (पेसा) असा केला जातो.
पेसा अंतर्गत (अनुसूचित क्षेत्रांतील) ग्रामसभेचे काही प्रमुख अधिकार व कर्तव्ये:
आदिवासींच्या परंपरा व रुढी, त्यांची सांस्कृतिक ओळख, सामूहिक साधनसंपत्ती आणि तंट्यावर निर्णय देण्याची रुढ पद्धती यांचे रक्षण व जतन करणे.
मादक द्रव्यांची विक्री व सेवन यांवर संबंधित पंचायतीमार्फत बंदी आणणे किंवा त्यांचे विनियमन करणे किंवा त्यावर निर्बंध घालणे.
अनुसूचित क्षेत्रातील गौण वनोत्पादनांचे विनियमन, समुपयोजन, व्यवस्थापन आणि व्यापार यांबाबत पंचायतीला निर्देश देणे.(अस्तित्वातील कायद्यातील तरतुदींना अधीन राहून)
ग्रामसभेच्या प्रत्येक सभेला संबंधित गाव कोतवाल, तलाठी, पोलीस पाटील, आरोग्य अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक, कृषी अधिकारी, महावितरणचा कनिष्ठ अभियंता, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित रहातील.

ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणण्याचे अधिकार!

सरपंच आणि उप सरपंच ग्रामसभेने केलेल्या सूचना व ठराव अमलात आणतील. आणि बेपर्वाई केल्यास ग्रामसभेला त्याचे विरोधात अविश्वासाचा ठराव आणता येईल. अविश्वास ठराव ३/४ बहुमताने मंजूर झाल्यास सरपंच किंवा उप सरपंच अनर्ह ठरतील. असा ठराव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर आणल्यास ते विभागीय शिक्षेस पात्र होतील. एखाद्या सदस्याच्या विरोधात प्रभागसभा बोलावून त्या सदस्याच्या विरोधात देखील अविश्वास ठराव आणता येतो अशा तरतूदी पेसा कायद्यात करण्यात आल्या आहेत.

आजच शेअर करा

Related Posts

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

March 20, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
Next Post
दृष्टीक्षेपात पालघर जिल्हा

■आदिवासींचा विकास खुंटतोय!

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

March 20, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

विक्रमगडमधे पाणी पुरवठा योजना अपूर्णच

विक्रमगडमधे पाणी पुरवठा योजना अपूर्णच

May 26, 2020
मान्सूनपूर्व कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी ८ दिवसाच्या आत पूर्ण करणार; एकनाथ शिंदे

मान्सूनपूर्व कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी ८ दिवसाच्या आत पूर्ण करणार; एकनाथ शिंदे

March 3, 2021
प्रदुषणकारी बजाज हेल्थ केअरने हस्तांतरित केलेले तीन कारखाने बंद

प्रदुषणकारी बजाज हेल्थ केअरने हस्तांतरित केलेले तीन कारखाने बंद

June 10, 2020
संशयास्पद रासायनिक घटक पोलिसांच्या ताब्यात

संशयास्पद रासायनिक घटक पोलिसांच्या ताब्यात

June 6, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!