◾विधान परिषदेच्या महिला उपसभापतींच्या बैठकीत राज्यमंत्री दर्जाच्या पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना बसवले कोपऱ्यात
व्यासपीठ बळकावण्याच्या नादात, शिवसेना नेत्याच्या उपस्थितीतच राज्यमंत्री दर्जाच्या अध्यक्षांना मिळतेय दुय्यम वागणूक
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: आदिवासी जिल्हा असलेल्या पालघर जिल्ह्यात राज्यमंत्री दर्जाच्या जिल्हा परिषद अध्यक्ष शिष्टाचारा पासून वंचित असल्याचे दिसून आले आहे. विधानपरिषद उपसभापती यांच्या पालघर येथील बैठकीत पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्षांना दुरवर कोपऱ्यात बसवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ठाण्याचे आमदार मात्र नेहमी प्रमाणे व्यासपीठ बळकावताना दिसून आले. यामुळे पालघर आदिवासी जिल्ह्यात आदिवासी लोकप्रतिनिधी यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचे समोर आले आहे.
पालघरच्या दौऱ्यावर असलेल्या विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पालघर मधील समस्यांचा आढावा घेत पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण यांना दुय्यम वागणूक देत कोपऱ्यात बसवल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या नंतर या बैठकीत शिष्टाचार नुसार जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण या पदाने महत्त्वाच्या या बैठकीत होत्या. मात्र राज्यमंत्री दर्जा असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या कडे दुर्लक्ष करत विधानपरिषद उपसभापती यांच्या एका बाजूला खासदार राजेंद्र गावीत व त्यांच्या बाजूला ठाण्याहुन येणारे आमदार व शिवसेना पालघर संपर्क प्रमुख रविंद्र फाटक तसेच इतर शिवसेनेचे पदाधिकारी बसले होते. तसेच दुसऱ्या बाजूला पालघर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक व त्यानंतर दुरवर पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्ष यांना बसविण्यात आले होते. यामुळे विधान परिषदेच्या महिला उपसभापतींच्या बैठकीत राज्यमंत्री दर्जाच्या पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा दुर्लक्षितच दिसून आले असल्याने पालघर मधील आदिवासी लोकप्रतिनिधींना दुय्यम वागणूक दिल्याचे समोर आले आहे.
◾ पालघर जिल्ह्यात लोकप्रतिनिधी यांना सुरूवाती पासूनच दुय्यम स्थान अधिकारी वर्गाकडून दिले गेल्याचे अनेकदा समोर आले आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लोकप्रतिनिधी यांना जुमानत नसल्याचे चित्र पालघर मध्ये दिसून येते. यातच विधानपरिषद उपसभापती यांच्या आजच्या बैठकीत पुन्हा एकदा हा प्रकार समोर आला आहे.
◾व्यासपीठ बळकावणार..
शिवसेनेची सत्ता जिल्हापरिषद व राज्यात असल्याने सद्या ठाण्याहून येणाऱ्या आमदारांनी व्यासपीठ बळकविण्याचा विडाच उचलला आहे. येथील लोकप्रतिनिधी देखील आपल्या पदाला न्याय देण्यासाठी परिपूर्ण नसल्याने सर्वांना ठाण्याचे उंबरठ्याव नतमस्तक व्हावे लागते. यातच आमदार रविंद्र फाटक हे शिवसेना पालघर संपर्क प्रमुख असल्याने आदिवासी जिल्ह्याच्या शासकीय बैठकीत व्यासपीठ बळकविताना ते नेहमीच दिसतात.