पालघर दर्पण: वार्ताहर
विक्रमगड : वाडा तालुक्यातील खुपरी या गावातील गणेश राऊत या शेतकऱ्यांच्या ५ म्हशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली घडली आहे. खुपरी गावात मोठ्या प्रमाणात कंपन्या वसल्या असून काही कंपन्यांमध्ये भूमिगत विजवाहिन्या वाहून नेल्या आहेत. अशातच एका कंपनीची विजवाहिनी जमिनीमध्ये तुटली असल्याने सकाळी ८ च्या दरम्यान रस्त्याने चरण्यास जाणाऱ्या ५ म्हशींना हा विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कंपनी प्रशासनाच्या आणि विद्युत महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळेसदर कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे भविष्यात नागरिकांचा जीव देखील धोका असल्याचे दिसून आले.