■ २६ जानेवारीला ट्रॅक्टर परेड करणार शेतकऱ्यांचे म्हणणे; कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असून दिल्ली पोलिसांनी याबाबत निर्णय घ्यावा असे सुप्रीम कोर्टाने सांगितले.
पालघर दर्पण : प्रतिनिधी
कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटना आंदोलन करीत आहे. हे आंदोनल २ महिन्यांपेक्षाही जास्त दिवस सुरू असूनही अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या मतावर ठाम असून तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. येत्या २६ जानेवारीला देखील आंदोलन सूरु राहील मात्र ते वेगळ्या पद्धतीने सुरू राहील असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी देखील आंदोल सुरूच राहील असे रविवारी शेतकरी संघटनांकडून सांगण्यात आलं. दिल्लीतील रिंग रोडच्या बाह्य भागात ट्रॅक्टर परेड करण्यात येईल व हे परडे अतिशय शांततेत पार पाडण्यात येईल. असे सिंधु बॉर्डर वर आंदोलनास्थळी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत संघटना प्रमुख योगेंद्र यादव यांनी सांगितले आहे.
मात्र शेतकऱ्यांना मोर्चा काढण्यास किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्यास मनाई करावी अशी याचिका केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांमार्फत दाखल केली आहे. शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्यामुळे पोलिसांनी याबाबत निर्णय घ्यावा अस सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.