■ काँग्रेस नेते राहुल गांधी इटली दौऱ्यावर; पक्षाच्या वर्धापन दिनी उपस्थित नसल्याने होत आहेत चर्चा.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाचा आज १३६ वा वर्धापन दिन आहे. मात्र असे असले तरीही राहुल गांधी परदेश दौऱ्यावर आहेत. एककिडे विविध स्तरातून पक्षाचा वर्धापनदिन साजरा केला जात असताना दुसकडी मात्र पक्षांचे नेतच परदेश दौऱ्यावर असल्याने राहुल गांधी यांनी सर्वत्र ठिकाणी चर्चा होत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे वर्धापनचदिनाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी इटलीला निघाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहेत. पक्षाचा वर्धापन दिन टाळून परदेश दौऱ्याला राहुल गांधी यांनी प्राधान्य दिल्याने विरोधकांना टीका करण्यासाठी आयते कारण मिळाले असल्याचे दिसून येते. भाजप नेते गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींवर टीका करत ट्विटवर भारतातील राहुल गांधी यांची सुट्टी संपली आहे. आज ते इटलीला परत गेले. असे ट्विट केले आहे. मात्र यावर टिकेवर काँग्रेस नेते राजीव सातव यांनी उत्तर दिले आहे.
■ म्हणून राहून गांधी गेले इटलीला.
राहुल गांधींवर भाजप कडून होणाऱ्या टीकांना राजीव सातव यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी सांगीतले की, राहुल गांधी यांच्या आजीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भेटण्यासाठी ते वर्धापनदिन सोडून इटलीला गेले. आपल्या घरातील जर कोणी आजारी असेल तर कोणीही सगळ्या गोष्टी सोडून आपल्या व्यक्तीकडे जाईल. त्याच बरोबर फेब्रुवारी महिन्यातच राहुल गांधी यांनी करोनाच संकट मोठं असेल अस सांगितलं होतं त्याकडे सरकारने लक्ष दिलं? लाखो शेतकरी सीमेवर आंदोलन करत आहेत. त्याकडे सरकार लक्ष द्यायला बघत आहे? असे प्रश्न उपस्थित केले.