Thursday, April 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

ग्रामीण भागात घातक रसायनाची विल्हेवाट

पालघर दर्पण by पालघर दर्पण
June 30, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या, राज्य
0
ग्रामीण भागात घातक रसायनाची विल्हेवाट
2
SHARES
77
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ वाडा- मनोर रोडवरील सापणे फाटा येथील घटना; तारापुर औद्योगिक क्षेत्रातील टाकावु घातक रसायनाची जंगल असलेल्या निर्जन स्थळी विल्हेवाट सुरू

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

हे पण वाचा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

बोईसर: तारापुर औद्योगिक क्षेत्रातुन घातक रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी केली जाणारी वाहतुकीचे प्रकार सुरू असतानाच आता अशा घातक रसायनाची विल्हेवाट लावली गेल्याचा विषय समोर आला आहे. वाडा- मनोर रस्त्यावर असलेल्या वनविभागाच्या जंगल भागात उग्रवास असलेले रसायन सोडले असल्याचे उघड झाले आहे. रस्त्यांच्या कडेला असलेल्या भागात सोडलेल्या रसायनामुळे येथील गवत देखील मेले असुन रस्त्यावर चालणाऱ्या व वाहन चालकांना देखील याचा त्रास जाणवत आहे.

तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातुन चोरट्या पध्दतीने रासायनिक घनकचऱ्यांची व रसायनाची वाहतूक केली जात असल्याचे गेल्या महिन्याभरात अनेकदा उघडकीस आले आहे. यातच एका बंद करण्यात आलेल्या रासायनिक कारखान्यातुन कारवाई झाली असताना देखील पुन्हा रसायनाची चोरटी वाहतूक केल्याचे दिसुन आले होते. मात्र याबाबत तक्रारी होऊन देखील प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याने केमिकल माफियांनी याभागात हैदोस घातला आहे. यातच आता ग्रामीण भागातील निर्जन स्थळी रसायनाची रात्रीच्या वेळी विल्हेवाट लावली जात असुन असाच प्रकार वाडा-मनोर रोड वरील सापणे फाटा येथे उघडकीस आला आहे. याठिकाणी शनिवारी रात्रीच्या वेळी घातक रसायन सोडून दिल्याने मोठ्या प्रमाणात लहान झाडांचे नुकसान झाले आहे. रसायन इतके घातक आहे की, दोन दिवस उलटून देखील याभागात रसायनाचा उग्रवास मोठ्या प्रमाणात येत आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पासुन साधारण पणे 15 किलोमीटर लांब असलेल्या वरले व सापणे गावाच्या मध्ये हे रसायन रस्त्याच्या बाजूला निर्जन स्थळी टाकण्यात आले आहे. वाडा- मनोर रस्त्यावर हा भाग असुन येथील जंगल भागाचा फायदा घेवुन केमिकल माफियांनी रात्रीच्या वेळी हे रसायन टाकल्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरा पासुन तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातुन टाकावु रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी चोरटी वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले होते. मात्र अशा कारखान्यांवर कारवाई बाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने देखील दुर्लक्ष केल्याने येथील केमिकल माफियांच्या माध्यमातून प्रदुषणकारी कारखानदारांनी केमिकल विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरूच ठेवले आहेत. यामुळे अशा प्रकाराबाबत प्रशासन कठोर कारवाई करण्याची मागणी नागरीकांन कडुन केली जात आहे.

◾ तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातुन निघाणारे घातक टाकावु रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी हे रसायन मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे पाठवणेबंधनकारक असते. मात्र तेथील प्रक्रिया खर्चिक असल्याने हा खर्च वाचविण्यासाठी केमिकल माफियांना या रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी ठेका दिला जातो.

◾ पावसाळ्यात रासायनिक घनकचरा व रसायनाची विल्हेवाट लावण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते. रात्रीच्या वेळी रसायनाची विल्हेवाट लावल्यानंतर जोरदार पाऊस पडल्यावर रसायनाची विल्हेवाट लावली हे दिसून येत नाही. परंतु हेच विषारी रसायन नदी नाल्यात वाहून जात असल्याने त्याचा धोका अधिकच वाढला आहे.

◾ मागच्या काही महिन्यापूर्वी पालघर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या साखरे डँम भागात औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यांचे रसायन सोडण्यात आले होते. परिणामी या कारखान्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही. फक्त वाहन चालकावर गुन्हा दाखल करून हे प्रकरण सोईस्कर पणे मिटविण्यात आले होते. या महत्त्वाच्या विषयावर जिल्हा प्रशासनाने देखील दुर्लक्ष केल्याचे दिसून आले होते.

◾ पोलीस चौक्यावरून रसायनाची वाहतूक

तारापुर औद्योगिक क्षेत्रातुन केमिकल माफियांनी रसायनाची व रासायनिक घनकचऱ्यांची बेकायदेशीर पणे वाहतूक केली जात असली तरी यावर स्थानिक पोलीस देखील दुर्लक्ष करतात. कारण याअगोदर बनावट कागदपत्रे दाखवुन घातक रासायनिक घनकचऱ्यांची वाहतूक करणाऱ्या माफियांना बोईसर पोलिसांनी सोडुन दिले होते. रात्री उशिरा होणाऱ्या वाहतुकीला बेटेगाव येथील तपासणी नाक्यावर अडवले देखील जात नाही. यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

आजच शेअर करा

Related Posts

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

March 20, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
Next Post

Supreme London Offers Reward for IDing Man Who Damaged Store Sign

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

March 20, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

सुनावणीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामांना तहसीलदारांन कडून मोकळीक

सुनावणीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामांना तहसीलदारांन कडून मोकळीक

November 16, 2020
ट्रॅक्टर परेड दरम्यान शेतकरी आक्रमक

ट्रॅक्टर परेड दरम्यान शेतकरी आक्रमक

January 26, 2021
विराज कारखान्याच्या बेकायदेशीर कचरा ढिगाऱ्याला आग

विराज कारखान्याच्या बेकायदेशीर कचरा ढिगाऱ्याला आग

February 22, 2021
अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत चार कोटी ९८ लाख रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत चार कोटी ९८ लाख रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त

February 3, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!